श्री शंकर प्रसन्न
संतकवि श्रीदासगणू विरचित
श्रीसंत गजानन महाराज
यांचे
श्रीगुरूपाठाचे अभंग
१.
|| गण गण गणांत बोते ||
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ।। १ ।।
लक्ष्मीकांतं कमल नयनं योगिभिर्ध्यान गम्यं ।
वंदे विष्णु भवभयहरं सर्व लोकेकनाथम् ॥ २ ॥
दयाघना श्री स्वामीसमर्था
गजानना गुरुवरा ।
कृपाकटाक्षे त्रिताप वारुन
रक्षण शिशुचें करा ॥धृ।।
अज्ञानाची रात्र भयंकर
चहूंकडे पसरली ।
विषयवासना सटवी टिटवी टी टी
करु लागली ।।१ ।।
दिवाभीत हा मत्सर पिंगळा
अहंकार साजिरा ।
मनवृक्षावर बसुन अशुभसा
काढु लागला स्वरा ॥ २ ॥
नानाविध संकटें चांदण्या
चमकाया लागल्या ।
त्यायोगानें सत्पथ वाटा
लोपुनी गेल्या भल्या ॥३।।
अरुणोदय तो तुझ्या कृपेचा
होऊं दे लवकर ।
चित्त प्राचिला उदय पावुं
दे बोधाचा भास्कर ॥४।।
दशेंद्रिये हीं दहा दिशा
त्या उजळतील त्यामुळें ।
सत्पथ वाटा दिसूं लागुनी
हितानहित तें कळें ।।५ ।।
तुझ्या कृपेचा अगाध महिमा
ज्ञाते जन सांगती ।
म्हणुन तुला मी दीनदयाळा
येतो काकूळती ।।६ ।।
अंताचा ना मुळीच बघवे वरदकर
धरि शिरीं ।
“काकडा”
सद्गुरुराया गजानना तंव
काकडा करितों ॥ आतां ॥
उद्धारास्तव बहू आदरानें
चरणद्वया धरितों ॥ धृ ॥
अज्ञानाची निशा मावळो
कृपाकटाक्षांनी ।
आशा सटवी टी टी करुनी
नाचविते अवनी ॥१॥
त्या सटवीला आहे आसरा मायामोहाचा
।
त्याचा टिकाव कधीं न लागे
तुज पुढती साचा ॥२॥
षड्रिपु बेटे खट्याळ मोठे
करिती निर्माण ।
भ्रमभोंवरा जो त्यामध्यें
देतो आम्हांस टाकुन ॥३॥
त्या भोंवऱ्याला तरुन जाया
पाय तुझे नौका ।
त्या नावेमध्यें भक्त बैसती
तयास टाकुं नका ॥४॥
दासगणूची हीच विनंती तुज
वारंवार ।
॥ आरती श्री गजाननाची ॥
जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जडमुढ ताराया ।
।। जय देव ।।धृ।।
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी ।
तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी ।
लीलामात्रें धरिलें मानवदेहासी ।। जय देव ।।१।।
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा ।
करूनी 'गणि गण गणांत बोते' या भजना ।
धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना ।
जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना ।। जय देव ।।२।।
लीला अनंत केल्या बंकट सदनास ।
पेटविलें त्या अग्नीवांचूनी चिलमेस ।
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।। जय देव ।।३।।
॥ श्लोक ॥
(वृत्त-उपेंद्रवजा)
विदर्भ देर्शी शिवग्राम मोठें । विराजती सद्गुरुनाथ जेथें ॥
कृपासुधा शांत करी जिवाला । नमूं हृदीं नित्य गजाननाला ॥ १ ॥
मला असें छत्र तुझ्या कृपेचे । जगीं न कोणीहि असें जिवाचें ॥
पदीं तुझ्या आश्रय दे नताला। नमूं दयासिंधु गजाननाला ॥ २ ॥
सहा रिपू हे मज त्रास देती । गती न होई परमार्थ पंथीं ॥
सहाय्य दे दीन अजाण बाला । नमूं गुणाधीश गजाननाला ॥ ३ ॥
भवीं बुडालों दिन व्यर्थ गेले । बघून ऐसें मन दग्ध झालें
॥
करास देई शरणागताला । नमूं जगबंधू गजाननाला ॥ ४ ॥
गजानना मंगलधाम देवा । मदंतरी ज्ञानप्रदीप लावा ॥
कृतार्थ मूढास करा दयाळा । नमूं जगत्स्वामी गजाननाला ॥ ५ ॥
अघास गंगा, विधु ताप नाशी । दरिद्रता कल्पतरुहि ध्वंसी ॥
त्रयीं हि त्वदर्शनी ने लयाला । तुला तुळा केवि गजाननाला ॥ ६ ॥
तुलाच गाती श्रुती साम गानें । सहाही शास्त्रे, अठरा पुराणें ॥
त्रिमुर्ती येई जन तारण्याला । नमो महासाधु गजाननाला ॥ ७ ॥
मनांत नांदो तव ज्ञानमुर्ती । भजावया दे जन चित्ती स्फुर्ति ॥
पदाब्जि दे ठाव मला कृपाळा । नमुं जगदंद्य गजाननाला ॥ ८ ॥
|| श्रीशंकर ।।
संतकवि श्रीदासगणू विरचित
“श्री गुरुपाठाचे अभंग”
संतचुडामणी स्वामी गजानन । तयाचे महिमान ऐका आतां ।।
योगयोगेश्वर हाचि एक जाणा । शेगांवींचा राणा गजानन ॥
तयाचिया पायीं ठेवा आतां
शिर । तरी व्हाल पार भवाब्धीच्या !।
गणूदास म्हणे आली ही पर्वणी । घ्यावी ती साधुनी
प्रयत्नानें ।।१।।
कोण हा कोठिचा कांहींच
कळेना । ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
।।
साक्षात ही आहे
परब्रह्ममूर्ती । आलीसे प्रचीती बहुतांना ।।
जानराव देशमुख झालासे आजारी । मृत्युशय्यैवरी पडला होता
।।
समर्थांचे तीर्थ तयासी
पाजतां । दूर झाली व्यथा गणू म्हणे
॥२॥
बंकटलालाचे तें झाले असें
घर । प्रती पंढरपूर स्वामीमुळे
।।
लांबलांबुनिया दर्शनास येती । लोक ते पावती समाधान ।।
भक्त भास्कराच्या -साठीं तें जीवन । केलें हो निर्माण खाचाडांत ।।
गणूदास म्हणे एका
प्रदोषकाळीं । दिसले चंद्रमौळी एक्या भक्ता ॥३॥
कावळे हाकिले
पंक्तीच्यामधूनी । अकोलींच्या बनी समर्थाने ।
अजूनीपर्यंत चाललें तें
व्रत । पहा अकोलींत जाऊनियां ॥
पितांबरा हस्तें आणविला
पाला । वठलेल्या वृक्षाला
कोंडोलींत ॥
गणू म्हणे शेगांवी
विस्तवावांचून । दाविली पेटवून चिलीम ती ॥४॥
मुकिंदा भक्ताचे कान्होले
ते दोन । केले कीं सेवन आवडीनें ॥
मोहळाच्या माशा डसतां अपार । राहिला तो स्थिर योगिराणा ॥
कुंभक करुनी काटे मधमाशांचे । टाकिले अंगाचे बाहेर की ।
गणूदास म्हणे योग ज्यासी
आला । अजिंक्य तो झाला जगामध्यें
॥५॥
गीताशास्त्रामाजीं
ब्रह्माचें लक्षण । सांगी नारायण अर्जुनातें ॥
जळेना तुटेना जे कां
कशानेंही । तेंच तत्व पाही ब्रह्म असे
॥
याचें प्रत्यंतर गोसाव्या
दाविलें । मळ्यामाजीं भले
कृष्णाजीच्या ॥
गणूदास म्हणे ऐसा अधिकारी । एक या भूवरी गजानन ॥६॥
बाळापुरी होता एक रामदासी । नाम होते ज्यासी बाळकृष्ण ॥
माघ वद्य नवमी पर्वणी ती
थोर । अवघे बाळापूर आनंदले ।।
त्याच दिनी स्वामी गेले
बाळापुरा । बाळकृष्णा घरा आवर्जून ॥
गणूदास म्हणे द्वारामाजीं
ठेले । कौतुक दाविले अभिनव ॥७॥
जटेचे ते केस रुळती पाठीवरी । कुबडी तीही करी चंदनाची ।।
ऊर्ध्व तो त्रिपुंड्र
भालासी लाविला । कंठी शुध्द माळा तुळशीची ।।
रामनामाची ती केलीसे गर्जना । वस्त्र अंगी जाणा
हुरमुजीचें ॥
गणूदास म्हणे स्वामी रामदास । हाच असे खास पूर्वीचा कीं
॥८॥
बायजाबाई नामे माळ्याची
कन्यका । एक होती देखा मुंडगांवांत ॥
आजन्म राहिली बायजा
ब्रह्मचारी । जेवी पंढरपुरी जनाबाई॥
राजाराम कवराचा फोड बरा
केला । देऊन अंगायला समर्थानीं ॥
गणूदास म्हणे बापुन्याकारण । करविले दर्शन विठ्ठलाचे ॥९॥
वासुदेवानंद योगयोगेश्वर । जयाचा अधिकार फार मोठा ॥
तेही आले स्वामी शेगांवीं
भेटाया । कांही ती कराया ब्रह्मचर्चा
||
एक तो श्रीविष्णु एक
विश्वेश्वर । दोघात अंतर मुळी नाही ।।
रक्तपिती व्याधी
गंगाभारतीची । निवटिली साची गणूं म्हणे ॥१०॥
खंडू पाटलाचे भाऊ अनावर । होते वतनदार शेगांवींचे ।।
आपुल्या शक्तीचा अभिमान
त्यां झाला । तोच निवटिला समर्थांनीं ।।
ऊंसाची ती मोळी हातानें
पिळून । दिधला काढून रस प्याया ॥
गणूदास म्हणे अशक्य तें
कांहीं । उरलेंच नाहीं समर्थाला ॥११॥
सोमवती पर्व माघमासीं आलें । लोक ते चालले दर्शनाला ॥
नर्मदेच्या कांठी बैसला
धूर्जटी । द्याया भक्ता भेटी ओंकारी
तो ॥
ओंकारेश्वर हे क्षेत्र
पुरातन । पातकाचें दहन जेथे होई ।।
गणूदास म्हणे येथेची दीधला । शंकराचार्याला संन्यास तो
॥१२॥
येथे पुण्यश्लोक मांधाता
भूपति । लोक अजुनि गाती कीर्ती
ज्याची ॥
पूर्वपुण्य ज्याचें सबळ
साचार । तोच येई नर क्षेत्रासी या
नर्मदेचें स्नान ओंकारदर्शन । घेत तया पुण्य बहुत लाभे ॥
गणूं म्हणे ऐशी माय ती
नर्मदा । नुपेंक्षी हो कदा
भक्तालागीं ॥१३॥
गजानन आले ऐशा त्या
क्षेत्रासी । हर्ष नर्मदेसी बहुत झाला ॥
पाप्यांची पातकें क्षेत्रें
घालवीती । तींच पावन होती साधुस्पर्शे ॥
नाव फुटल्याचें करुनी आमीष । नर्मदा सेवेस प्रकटली ।।
गणूदासम्हणे लावुनिया हात । पैल तटाप्रत नेली नौका ||१४||
धार कल्याणींचा साधु रंगनाथ । आला शेगांवांत भेटावया ॥
उभयतांमाजीं ब्रह्मचर्चा
झाली । ती ज्यांनी ऐकिली तेचि धन्य
॥
साधूच्या मुखींचे शब्द हे
अमृत । पडतां श्रवणांत तरुन जाय ।।
गणूदास म्हणे साधूची महती । देवही वानिती स्वर्गामध्ये
॥१५॥
साधूचा वशीला जयासी लागला । तोच सरता केला पांडुरंगे ॥
संत हे हरीच्या गळ्याचे
ताईत । संत हे साक्षात कल्पतरु ॥
संत हेचि जाणा मोक्षाचे
वाटाडे । तेवि ज्ञानगाडे प्रत्यक्षची
॥
गणूदास म्हणे आतां बोलू
किती । रुक्मिणीचा पती नमी त्यासी
॥१६॥
अर्जुनाचें घोडे धूतसे
भगवान । करी बाळंतपण चोख्याघरीं ॥
दामाजीपंताची रशीद बेदरी । झालासे हरी पोहोचवीता ।।
नाथाचे सदनीं पाणी तें
वाहिले । शेत रक्षियलें सावत्याचें ॥
गणूदास म्हणे ऐसा संतप्रेमा । आहे पुरुषोत्तमा पहा तुम्ही
॥१७॥
आळंदी, पैठण, देहू, अष्टी, तेर । तैसां तो साचार सज्जनगड ।।
अरण, मंगळवेढें संतांची ही गांवें । तैसैचि लेखावें शेगांवला ||
कोणत्याही अंशें फरक नाहीं
यांत । शेगांव साक्षात संतभूमी ।।
प्रभातीं या गांवा भावें
आठवितां । गणूं म्हणे चिंता होते दूर
॥१८॥
नरजन्माचे या सार्थक करा रे । अहोरात्र ध्यारे पांडुरंगा
॥
गजाननापायीं द्दढ श्रध्दा
ठेवा । द्वेष तो नसावा कोणाचाही ॥
प्रत्येक गाहाणे सांगा
संतापाशीं । होईल तो त्यासी निवटिता ॥
गणूदास हेंची सांगे वारंवार । जोडा आतां कर गजानना ॥१९॥
गुरुराया आमुची उपेक्षा न
करी । तुझ्या बळावरी आमुच्या
उड्या ।।
त्रिविध तापाचें निर्मूलन
करा । आरोग्य शरीरा देऊनिया ।।
हात पसरण्याचा प्रसंग ना
आणी । कोणापुढे जनीं गजानना ।।
गणूदास म्हणे आनंदीत वृत्ती । ठेवावी गुरुमूर्ति सर्वकाळ
॥२०॥
वारी शेगांवाची करी जो कां
भक्त । तयासी अनंत सांभाळील ॥
गजाननापायीं शुद्ध ज्याची
निष्ठा । तयालागी कष्टा दे ना हरी ॥
गजानन कीर्तिचे करी जो कां
गान । तया नारायण दूर नाहीं॥